
(Bhartatil Jati : Tyanchi Yantrana, Udbhav Ani Vikas)
लेखक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
जातिव्यवस्था जाणीवपूर्वक संपवल्याशिवाय भारतातील व्यक्ती आणि समाजाचा सर्वांगीण विकास अशक्य असल्याचा निष्कर्ष
डॉ. बाबासाहेब आंबेडकर काढतात आणि त्यामुळे ते जातिविनाशाची बुलंद हाक देतात. या आवाहनाचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर होऊन कालबद्ध टप्प्यांत जातिविनाशाकडे आपण मार्गक्रमण करून काही दशकांत तिचे निर्मूलन घडवून आणायला पाहिजे होते. पण तसे काहीही झाले नाही. किंबहुना, बदलत्या काळानुसार जातिअंताची तोंडी मागणी करणारे दलित-वंचित जातिसमूहसुद्धा शोषणमुक्तीच्या संघर्षशील वर्गीय लढ्यातून आमूल समाजपरिवर्तन घडवण्याची भाषा सोडून देऊन आता जातीय ओळखी वापरून जातीपुरत्या, किंबहुना प्रत्येक जातीत तयार झालेल्या छोट्या मध्यमवर्गाच्या उद्धाराचे (दुः) स्वप्न पाहण्यात मश्गुल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर या नव्या अनुवादाच्या प्रस्तुतीकरणाकडे आपण कसे पाहणार आहोत? खरेतर प्रत्यक्ष जातिनिर्मूलन करूनच आपण बाबासाहेबांच्या या आवाहनाची शतकपूर्ती करू शकतो. निव्वळ त्या भाषण किंवा पुस्तकाची शतकपूर्ती ही सर्वंकष क्रांतीतून समताधिष्ठित समाज निर्माण करू पाहाणाऱ्या सर्वांचाच पराभव आहे असे खेदाने म्हणावे लागते. पण इतकं म्हणूनही अस्तित्वशील जातिव्यवस्थेच्या नव्या विश्लेषणासाठी आणि त्यानंतर अपरिहार्यपणे तिच्या निर्मूलनासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे शतकापूर्वीचे लेखन आपणाला प्रेरणादायी असेलच. म्हणून जाती समजून घेण्यातून त्यांच्या निर्मूलनाचा उद्देश विस्मृतीत जाऊ न देण्यासाठी या लिखाणाचे वाचन आणि विश्लेषण करत राहणे अगत्याचे आहे.
- प्रस्तावनेतून
MRP ₹440 ₹395 (45₹ Discount)