
(Adrushya Bharat)
लेखक : भाषा सिंह
प्रकाशन : शब्द
हाताने विष्ठा वाहून नेण्याच्या प्रथेवरील ह्या प्रकारचे पहिले पुस्तक.
काश्मीर ते कर्नाटक, पूर्व ते पश्चिम, अशा अनेक भागांमधील सहज दिसून न येणाऱ्या भारताचे वर्णन ह्या पुस्तकात आहे. हा असा भारत आहे जो अदृश्य आहे, ज्याचे कुठेही विश्लेषण होत नाही. हे पुस्तक त्या वास्तवासमोर धरलेला आरसा आहे. लढाऊ आणि मान्यवर पत्रकार भाषा सिंह यांनी आठ वर्षे काम करून भारतातील दहा राज्यांतील हाताने विष्ठा वाहून नेणाऱ्यांच्या खदखदणाऱ्या परिवर्तनाची परिस्थिती ह्या पुस्तकाद्वारे पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
'हे पुस्तक अस्पृश्यता आणि जातिव्यवस्था यांनी सर्वाधिक शोषण केलेल्या हाताने विष्ठा वाहून नेणाऱ्या समूहाची हृदय पिळवटून टाकणारी कहाणी आहे. त्या समूहाशी सतत साधलेल्या संवादामुळेच ह्या पुस्तकामधून त्यांचे दुःख, त्रास आणि अपमान आपल्यासमोर आले आहेत. समता आणि मानवी आत्मसन्मान यांना जोपासणाऱ्या लोकांच्या विवेकबुद्धीला हे पुस्तक अस्वस्थ करील.'
- सुखदेव थोरात, माजी अध्यक्ष, विद्यापीठ अनुदान आयोग
'आपल्या समाजावर लागलेल्या अतिशय घाणेरड्या डागावर अत्यंत संवेदनशील पद्धतीने लिहिले गेलेले हे पुस्तक आहे. हाताने विष्ठा वाहून नेण्याच्या अमानुष आणि वाईट प्रथेच्या विध्वंसक सामाजिक प्रभावाला गांभीयनि हाताळणारे हे पुस्तक सगळ्यांचे डोळे उघडील. हे पुस्तक आपल्या मनात वेदना आणि लाजच नव्हे तर चीडही निर्माण करील.'
जयराम रमेश, माजी ग्रामीण विकास मंत्री, भारत सरकार
'विष्ठा वाहून नेणाऱ्या समूहाला उपेक्षित ठरवणाऱ्या व्यवस्थेविषयीचे सत्य आपल्या लेखनातून भाषाने प्रभावी रीतीने व्यक्त केले आहे. आपल्या सर्वांच्या जाणिवेला हलवून सोडणारे हे पुस्तक केवळ ह्या प्रश्नाचा संदर्भ देण्याचे काम करणार नाही; तर ह्या देशातील हाताने विष्ठा वाहून नेण्याच्या प्रथेविरुद्ध संघर्षाच्या हत्याराचे काम करील.'
- डी. राजा, राष्ट्रीय सचिव, भारतीय कम्युनिस्ट पार्टी
MRP ₹460 ₹415 (45₹ Discount)