
(Nirvanicha Shabda)
लेखक : रमेश इंगळे उत्रादकर
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
कविता कवीला जगणं शिकवते. कवीनं कविता लिहीत राहणं म्हणजे सर्वंकष चांगली व्यक्ती बनण्याचा प्रयत्न करत राहणं असतं. आत्मिक, आध्यात्मिक उन्नती साधण्याच्या मार्गानं प्रवास करणं असतं. स्वतःला अधिकाधिक शुद्ध करत जाणं असतं. आणि यापुढे जाऊन असंही म्हणता येईल की, कवीनं कविता लिहीत राहणं म्हणजे स्वतःला संतत्वाकडे नेण्याच्या वाटेवर पाऊल ठेवणं असतं.
कवी कविता लिहीत राहण्याच्या प्रवासात स्वतःला बदलवू शकत नसेल तर तो आत-बाहेरच्या लढायांमध्ये आपली ऊर्जा व्यर्थ घालवतो असंच म्हणावं लागेल. कवितेत समाज बदलण्याची, समाजात क्रांती घडवून आणण्याची शक्ती किती आहे, हे सांगता येणार नाही परंतु कवितेत स्वतः कवीत बदल घडवून आणण्याची शक्ती मात्र हमखास असते. कारण कविता हा काही निव्वळ शब्दांचा खेळ नसतो. ते कवीच्या भावनांचे, विचारांचे, दृष्टीचे, विवेकी अंतःसृष्टीचे अलौकिक छायाचित्र असते. आत्यंतिक जबाबदारीने केलेले मौलिक कृत्य असते. म्हणूनच कवी उच्चारतो तो प्रत्येक शब्द निर्वाणीचा असतो.
- रमेश इंगळे उत्रादकर
MRP ₹225 ₹180 (45₹ Discount)