
(Ata Vahya Sagalya Budit khati)
लेखक : अनुराधा पाटील
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
आता वह्या सगळ्या बुडीत खाती या कवितासंग्रहाच्या शीर्षकावरून तुकोबाचा सदर्भजागा होतो. तुकोबांनी सावकारी कर्जदारांच्या हिशोबाच्या वह्या आपणहून नदीत बुडवून अपराधीपणाच्या भावनेतून सुटका मिळवण्याचा प्रयत्न केला. तर तुकोबांच्या कवितेच्या वह्या प्रस्थापित धर्ममार्तंडानी नदीत बुडवून त्यांची मुस्कटदाची करण्याचा प्रयत्न केला. दोन्ही अनुभव कवीसाठी वेदनेचे होते.
अनुराधा पाटील यांच्या या संग्रहातील कवितांचे नाते या दोन्ही प्रकारच्या अनुभवाशी आहे. काही उल्लेखांवरून स्पष्ट दिसते की ही कविता निखळपणे गेल्या दशकभराच्या काळाविषयीची आहे. ज्या मानवी मूल्यांचे असणे आपण आजवर गृहीत धरले ती मूल्ये अचानक आलेल्या वावटळीत गरगरून नाहीशी होतात, त्यातून आलेले भांबावलेपण, आणि जगण्याचा असा मूल्यात्मक अर्थ गमावल्याने आलेली विफलता या कवितांतून व्यक्त होते. आजचे हे मूल्यहीन आणि संवेदनाहीन जीवन विशिष्ट राजकीय, सामाजिक स्थितीमुळे प्रतिष्ठा पावले आहे. या राजकीय विचारांचा आणि स्थितीचा समाचारही ही कविता आपल्या पद्धतीने घेते. आजच्या काळाचा अन्ववार्थ लावताना अनुराधा पाटील यांच्या मितव्ययी भाषेतून प्रकट होणाऱ्या प्रतिमा, प्रतीके, मिथकांनी हा आशय अधिक टोकदार होता.
या कवितेत अस्वस्थ विफलता आहे, पण म्हणून ती निराशाबादी नाही. दूषित झालेल्या भोवतालाच्या पराकोटीच्या दाबामुळे आपल्या कवितेला कोवळ्या तरल शब्दाची मिजास भिरकावून... उग्र वासाच्या काटेरी जंगलात शिरावे लागले आहे असे कवयित्री म्हणते. 'भोवतालाचा दांभिक मुखवटा फाडून त्याच्या नजरेला नजर देण्याची' हिंमत ती बाळगून आहे. हे या कवितेचे मोल आहे.
अनुराधा पाटील यांच्या मूळच्या तरल. अतर्मुख कवितेने वाळूच्या पात्रात मांडलेला खेळ या संग्रहापासून नवे बहिर्मुख वळण घेतले. या दिशेने, स्त्रीची घुसमट राजकीय स्वरात माडणारी त्यांची कविता आता वह्या सगळ्या बुडीत खाती या संग्रहात अधिक स्पष्टपणे राजकीय झालेली आहे. धार्मिक कट्टरता, विद्वेष यांनी क्षित झालेल्या आजच्या सामाजिक-राजकीय पर्यावरणाविषयी ही कविता करत असलेले विधान महत्त्वाचे आहे.
- नीतीन रिंढे
MRP ₹375 ₹320 (55₹ Discount)