
(Me Me Urfa Selfi)
लेखक : आनंद विनायक जातेगावकर
प्रकाशन : शब्द पब्लिकेशन
रणाविण स्वातंत्र्य कोणा मिळे ?
पण हे रण नव्हतं, यादवी होती. यादवी फाळणीला घेऊन आली. आणि मग स्वातंत्र्याकडे डोळे लावून बसलेली ही वृद्ध नेतेमंडळी फाळणीनंतरच्या इतर समस्या सोडवण्यात गळ्यापर्यंत बुडून गेली. दोन्ही देशांतील प्रमुख धर्म वेगळे असतील पण संस्कृती मात्र तीच - पुरुषप्रधान. आजवरच्या स्त्रियांच्या इतर प्रश्नांसारखाच अपहृत स्त्रियांचा प्रश्न कुणी हाती घ्यायचा हीच खरी समस्या होती. केवळ भारत अथवा पाकिस्तानातील हिंदू, मुसलमान किंवा शिखांना स्पर्शणारी ही समस्या नव्हती. ती माणसाच्या जातीला व्यापणारी, व्यापून दशांगुळे उरणारी, स्त्रीत्वाच्या गाभ्याशी भिडली होती. तिला एक स्त्रीच न्याय देऊ शकेल असं म्हणता येईल का आपल्याला? तसं म्हणता येणार नाही. मात्र मानवतेची विशाल दृष्टी असणारी व्यक्तीच ती समस्या हाती घेण्यास योग्य होती.
- कादंबरीतून
MRP ₹280 ₹250 (30₹ Discount)